मनमें है विश्वास,पूरा हो विश्वास,हम होंगे कामयाब एक दिन !
ह्या ओळी अगदी सार्थ आहेत.कुठलीही गोष्ट दुसऱ्यासाठी वा स्वतःसाठी करतांना एकमेकांबद्दल किंवा स्वतःबद्दल विश्वास असेल तर कोणतीच समस्या येणार नाही.
अगदी बाळ असल्यापासून मोठं होईपर्यंत त्याचा आईवर अतिशय विश्वास असतो.पण मोठं होता होता(शिंग फुटल्यावर) मुलाने सुद्धा चांगल्या वागणूकीने आईवडिलांचा विश्वास संपादन केला पाहिजे.पति पत्नी मधे विश्वास असेल तर कौटुंबिक स्वास्थ्य लाभते.नाहीतर मुलाबाळांसकट संसाराची वाट लागलेली आपण बघतो.
खेड्यापाड्यात किंवा शहरात सुद्धा कित्येक गोष्टींवर अंधविश्वास ठेऊन संसाराची धूळधाण उडालेली दिसते.तरीही आता अंनिस संस्थेने पुढाकार घेऊन परिस्थिती खूपशी आटोक्यात आणलेली आहे !
म्हणूनच आपण विश्वासार्ह वागून आणि चांगले आचरण ठेवून आपले नातेवाईक,मित्र परिवार ह्यांची मर्जी संपादन केली तर जीवन आनंदात आणि सुखात जाईल.
No comments:
Post a Comment