भास
अनुत्तरीत प्रश्नांना ,उत्तराची आस
कविता म्हणजे निव्वळ भास
भरून येते ,उमलून येते
शब्दांची पालखी सजून येते
अर्था अर्थांच्या बसतात गाठी
विचारात जातो तांसन्तास
कविता म्हणजे निव्वळ भास
स्वप्नांवर जडतो जीव
शब्दांची भाषा सजीव
मन मोर पिसारा फुलतो
गंधाळलेला नवा श्वास
कविता म्हणजे निव्वळ भास
भाव आडकतात वेशीमध्ये
अर्थ दडतात शब्दांमध्ये
शब्दांनाही फुटतात पाय
गुंतता गुंतता होते रास
कविता म्हणजे निव्वळ भास
कळते तरी वळत नाही
सुटु म्हणता सुटत नाही
रोज नव्याने जवळ येते
गुटमळत राहते आसपास
कविता म्हणजे निव्वळ भास
No comments:
Post a Comment