मला आवडलेलं पुस्तक.......!"पावन खिंड", "शिव छत्रपती","मी वनवासी", "हिटलर वर लिहिलं गेलेलं कुठलही पुस्तक-उदा."नाझी भस्मासुराचा उदयास्त", "हिटलर"इ. अशी बरीच पुस्तक आवडतात......!पण आज जे पुस्तक मी शेअर करणार.....ते म्हणजे मला कुठल्याही पानापासून ,केव्हाही आवडीने वाचाव वाटत असं--- आ.पु.ल.नच -"असा मी असामी"! "हे" पुस्तक नाहीच.....ही यात्रा आहे!ही मांदियाळी आहे!हा प्रवास आहे!आणि हे हळूच गुगुदुल्या करत आपल्या वर्मावर बोट ठेवणार "पात्रांचं आणि व्यक्तिचित्रणानच"मोठ्ठ संग्रहालय आहे.सर्व सामान्य मानवी स्वभावाच्या सप्तरंगी छटांच दर्शन आपल्याला "यात"होत.सर्वसामान्य , मध्यम वर्गीय लोकांना जगण्यासाठी करावी लागणारी तडजोड , काहीच नाही तर एक चांगल निष्पाप -कुणाच्याही वाट्याला न जाता फक्त आपला आयुष्य-गाडा हाकताना करावी लागणारी कसरत, ह्या सगळ्या गोष्टींशी आपण वाचता-वाचता केव्हाच एकरूप होत ते कळत देखील नाही. आपण स्वत:ही आपला शोध घ्यायला लागतो की......मानसिक दृष्ट्या मी निश्चित यापैकी कुठल्यातरी पात्राशी मिळती-जुळती आहे.कारण कुठल्याच वयोमानाच पात्र यातून सुटलेलं नाही.आणि प्रत्येक पात्राला आपण त्या-त्या वयाच्या चोचल्या- नखर्यानसह भेटतो.अगदी गृहिणी पासून तर "बाबांपर्यंत"कितीतरी पात्र त्या काळातला शब्दांचा ,सामाजिक परिस्थितीचा परिचय करून देतात. पूर्वी असलेला लोकांमधला जिव्हाळा, चाळीतल एकोप्याचं जगण , एकमेकांच्या दु:ख सुखात आनंदाने सहभागी होणारे शेजारी या ही "संस्कृती"शीआपली जवळून गाठ-भेट होते.छोट्या-छोट्या गोष्टींमध्ये आनंदित होण्याची सर्व सामान्य माणसाची समाधानी -मानसिकता पुस्तकाच्या प्रत्येक प्रकरणात आपण पाहतो. सोबतच खूप साऱ्या खोट्या -मोठेपणाच्या संकल्पनानशि जुळवून घेताना -साधी-सुधी माणस किती गोंधळून जातात आणि त्यांच्या मुळच्या साधे पणापर्यंत सतत परतून जातात.हे वास्तव देखील "या"पुस्तकाच एक वैशिष्ट्य म्हणता येईल. राहिली गोष्ट लेखकांची.....तर आ.पु.ल.न विषयी लिहिण म्हणजे आपल्या अज्ञानाच प्रदर्शन होऊ शकत......कारण महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्व आणि त्यांच्या विषयी माहिती नसणारी व्यक्ती महाराष्ट्रात मिळणे अशक्य.....त्यामुळे आ.पु.ल.ना प्रणाम,नमस्कार.....!इतक्या सुंदर "भाव विश्वाची"निर्मिती आपल्या साठी केली म्हणून.......!खर सांगायचं तर या पुस्तकाला "नव चैतन्यच"वरदान आहे...आपण जितक्या वेळा वाचतो...तितकच ते पुन्हा -पुन्हा वाचाव वाटत; आणि प्रत्येक वेळी वाचल्यानंतर पुन्हा एकदा वाचाव ही ओढ कायम राहते.
Subscribe to:
Post Comments (Atom)
भावार्थ कट्टा
काय, किती आणि कसं खायचं? – विज्ञानाधारित आहाराचं सोपं आणि सस्टेनेबल मार्गदर्शन
पुस्तक: काय, किती आणि कसं खायचं? – सोप्पं आणि सस्टेनेबल, सायन्स बेस्ड न्यूट्रिशन लेखक: अमिता गद्र परीक्षक: समीर गुधाटे “अन्न म्हणजे फक्त पो...
-
लेखक: अॅड. रवींद्रनाथ पाटील समीक्षक: समीर गुधाटे ❝ ही कहाणी तुरुंगात गेल्यानंतरची नाही... ही कहाणी एका माणसाच्या आतल्या तुरुंगातून बाहेर...
-
पुस्तक: के कनेक्शन्स लेखक: प्रणव सखदेव परीक्षक: समीर गुधाटे "बालपण आठवलं की हसू येतं, आणि आठवणींत हरवून जातं मन." ‘के कनेक्शन्स’...
No comments:
Post a Comment