सर्वस्वाची करूनी होळी
स्वातंत्र्य आणले ज्यांनी खेचूनी,
ते हुतात्मे,ते महात्मे
इतिहासाच्या पुस्तकात
अमर जाहले!
परी,त्याच स्वातंत्र्यापायी
झाली
अखंड हिंदुस्थानाची फाळणी अन्
सप्तरंगांची उधळण न होता
पुनश्च एकदा
कितीकांच्या सर्वस्वाची झाली होळी!
आजही सीमेवरच्या किती पिढ्या सोसताहेत
त्या होळीची धग ,
त्या धगीतूनच परत परत
पेट घेत आहे जुने वैर!
वचने,आश्वासनांच्या वा
युद्ध,तह,वाटाघाटींच्या शिंपणाने
शांत होत नाहीये ही होळी
आणि धुळवड मात्र सारखी साजरी होतीये!
एका ठिणगीही पुरते आहे प्रज्वलित करण्या
मनामनातला सुप्त निखारा!
शांतवाया त्यांना पुरे न पडे हवेतच विरणारा पोकळ शब्दांचा फवारा,
हवा त्यास्तव शीतल कृतीयुक्त तुषारांचा शिडकावा!
तरच थांबेल
रंगारंगांमधले चालू युद्ध,
अंबरी खुलेल सप्तरंगी इंद्रधनुष्य!
No comments:
Post a Comment