कुणी कोटी केल्यावर
हास्याचे फवारे उडतात !
कुणी कोटी जिंकल्यावर
आनंदाने उड्या मारतात !
कोणी कोटी गमावल्यावर
दुःखा वेगाने रडत बसतात !
तर कोणी कोटी जपा नी
आराध्याच्या जवळ जातात !
कोटी एकच पण तिची रूपे किती वेगळी
देऊन जातात सुख ,दुःख आणि आत्मिक सुख !
यातलं नेमकं आपल्याला काय हवंय
हेच माणसाला कळत नाही !
सगळा जन्म आनंद ,सुख ,समाधान
शोधण्यात मिळवण्यात जातो
पण हाती काहीच लागत नाही !
रडत जन्मलो तरी समाधानात जायचं असतं
कुणाचं चांगलं करता नाही आलं तरी वाईट तरी करायचं नसतं
माणूस खरच चांगला होता म्हटलं पाहिजे राहिलेल्यांनी
असं वागून त्यांच्या डोळ्यात दोन थेंब तरी उरायचं असतं !!
No comments:
Post a Comment