अक्षर
अक्षर अक्षर जुळवून जेंव्हा
शब्द तयार होतो
सुखदुःखाच्या गोष्टी तेंव्हा
तो सांगून जातो !
अक्षरानेच शब्द बनतो
आणि शब्दानेच भावना
भावनेनेच एक एक उमलते
गद्य पद्यातील संवेदना !
उमटल्या ज्या मनात संवेदना
कागदावरही उतरती
सारा खेळ मग शब्दांचा
हळुवार ते पाझरती !
कोणी लिहिली सुखदुःखाच्या गोष्टी
कोणी दुःखा वेग
कोणी सांगती कर्म कहानी
कोणी संचित योग !
अक्षरानेच उभे राहिले
शब्दांचे ते डोंगर सारे
कांही नजरेत पाहू जाता
दिसती अक्षरा विना ही काही अक्षरे !!
No comments:
Post a Comment