खरं तर आयुष्याच्या प्रवासातले प्रत्येक वळणच
असते नवी सुरूवात,
जन्म,शिक्षण,नोकरी,प्रपंच
आणि शेवटचे उतारवय,
शिकत राहतो आपण
कधी चुकतो,सावरतो,
कधी यशस्वी,कधी अयशस्वी,पण
प्रयत्न अथक करत राहतो!
सुरूवात चांगली व्हावी
ही केवळ इच्छा
असून चालत नाही,
करायला लागतात कष्ट आणि मनात असावी लागते जिद्द!
व्यवहाराच्या पलीकडेही असतात अनेक कामना,
खूप काही छंद आणि भावना!
पण कोणतीही सुरूवात करणं,
वाटतं तितका सोपा नाही खेळ,
भावना,अर्थकारण,वेळ
सार्यांचा घालावा लागतो यथायोग्य मेळ!
अन्यथा,दिवस,वार मास वर्ष सरत जातात,
कशाची करायची होती सुरूवात,
त्या फक्त सलणार्या आठवणी होतात.
यास्तव ,दिवस वार मुहूर्ताची बघू नये वाट,
योग्य संधी मिळताच
शुभस्य शीघ्रम् म्हणत
करावी लगेच नवी सुरूवात!
No comments:
Post a Comment