बुद्धिबळातील राजा
आज जिंकला होता
बुद्धिबळाच्या जोरावर
तरी तो रडत होता
जिंकून सुध्दा.....
हत्ती गेले उंट गेले
घोडे गेले वजीर गेले
प्यादे सुध्दा गेले
होते एखाद दुसरे शिल्लक
सोबत कोणी न उरले
म्हणून,
राजा रडत होता
जिंकून सुध्दा.....
ही गोष्ट,
सारीपटावरच्या राजाची नाही
आयुष्याचा सारीपाटही
थोडाफार कळायला लागतो
नाहीतर,
जगात मी च्या जगण्यात
सांगा ना कधी
कोण कोणासाठी उरतो
म्हणून बुद्धही,
कधी कधी कळायला लागतो
नाहीतर जगात
कोण कोणासाठी असतो.....
पृथ्वी, जल, अग्नी
वायु आणि आकाश
हेच,
त्रिकालाबाधित सत्य आहे
हे ज्याला कळते
तोच अजरामर असतो
नाहीतर
बुद्धिबळाचा पट असो
वा
आयुष्याचा
तो जगात जिंकून सुध्दा
हरलेला असतो...............
No comments:
Post a Comment