उन्हाळ्यात गावाकडं समद्यांची
हाथरुणं अंगणात असायची
दहा-पंधरा पोरांचं लेंढार
तवा आजीभोवती जमायची
कुटुंब समदं एकत्र होतं
सख्खी ,चुलत समधीच असायची
आत्या ,मामाची पोरं बी
सुट्टीला सारी एकत्र जमायची
आजीभोवती मंग गराडा
समद्यांचाच पडायचा
नवी गोष्ट ऐकाया मिळणार म्हुन
प्रत्येक जण खुश असायचा
आजीची गोष्ट कदी मंदी राजा राणीची
तर कधी कधी भुता-खेता ची
गोष्ट ऐकुनशान समदी
लई घाबरून जायाची
मग रातभर एकमेकांना बिलगून
हळूच झोपून जायची
आता गावाकडं ना घर राहिलं
ना आंगण ना गोष्ट सांगणारी आजी
वन बीएचके च्या फ्लॅट मंदी घरातली
इनमिन तीघंबी मोबाईल मध्ये बिझी
No comments:
Post a Comment